रात्रं-दिवस होणाऱ्या विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- सुमारे तीन महिन्यापासून शहरामध्ये जुन्या वीजवाहक तारा काढून त्याऐवजी एकच केबल (बंच) टाकण्याचे काम चालू आहे.

मात्र या कामावर पाथर्डी च्या विद्युत विभागाचे नियंत्रण नसल्याने डीपी नादुरूस्त होणे व नवीन टाकलेले केबल अवघ्या काही दिवसात जळत आहेत.

यामुळे दिवसा व रात्रीही अनेकवेळा वीज पुरवठा खंडित होतो. कधी कधी तर सलग सात ते आठ तास वीजपुरवठा खंडीत होत आहे.गेल्या तीन महिन्यापासून दिवस-रात्र विजेचा लपंडाव सुरू असल्याने पाथर्डीकर त्रस्त झाले आहेत.

नागरिकांकडून वीज बिलाची रक्कम विद्युत विभाग जमा करत असल्याने ग्राहकांना अखंडितपणे वीज देणे हे विद्युत विभागाचे काम आहे.

मात्र विद्युत विभाग नगरपालिकेकडे तर नगरपालिका ठेकेदार कंपनीकडे बोट दाखवत असल्याने ग्राहकांना मात्र अंधारातच चाचपडत राहावे लागत आहे.

वीज बिल वेळेवर भरले नाही तर संबंधित विभाग विजजोड तोडण्यासाठी जी तत्परता दाखवते, त्याच प्रकारे नागरिकांना सुविधा मिळण्यासाठी तत्पर राहावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment