जिल्ह्यात कोरोनामुळे बुधवारी आणखी २० जणांचा बळी गेला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनामुळे बुधवारी आणखी २० जणांचा बळी गेला. आतापर्यंत ५३३ जणांचा मृत्यू झाला आहे. २४ तासात नवे ९०६ रुग्ण आढळले. त्यामुळे बाधितांची संख्या ३३ हजार ८१३ झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत ९६, खासगी प्रयोगशाळेत ४०३ आणि अँटीजेन चाचणीत ४०७ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा ४५, संगमनेर ५, राहाता १,

नगर ग्रामीण १७, श्रीरामपूर १, कॅन्टोन्मेंट १,नेवासे ७, श्रीगोंदे ४, अकोले १, राहुरी २, जामखेड १, मिलिटरी हॉस्पिटल ११ अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत मनपा १६३, संगमनेर १०,

राहाता २३,पाथर्डी ५, नगर ग्रामीण ५४, श्रीरामपूर २१, कॅन्टोन्मेंट ९, नेवासे १९, श्रीगोंदे ७, पारनेर २९, अकोले १३, राहुरी ३१, शेवगाव ३, कोपरगाव ७, जामखेड ६ आणि कर्जतच्या ३ रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत मनपा १७, संगमनेर २९, राहाता ४१, पाथर्डी ३०, नगर ग्रामीण १३, श्रीरामपूर १८, कॅन्टोन्मेंट ४, नेवासे ६४, श्रीगोंदे २२, पारनेर १२, अकोले ९, राहुरी ६६, शेवगाव २४,

कोपरगाव २९, जामखेड १९ आणि कर्जत १० अशा रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात दिवसभरात २० जणांचा मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या ५३३ झाली आहे. सध्या ४७६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment