जनतेपेक्षा विरोधकांना राजकारणात जास्त रस – अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :-  महाराष्ट्र राज्यात मागील सहा महिन्यांपासून कोरोना महामारीचा मुकाबला आघाडीचे सरकार करत आहे.

कोरोना संदर्भात आवश्यक त्या उपाययोजना आखल्या गेल्या असून सरकार नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षेसाठी गांभीर्यानं काम करत आहे.

कोरोना संकटाच्या आव्हानात्मक परिस्थितीत विरोधक मात्र काही घटनांचे भांडवल करत राजकारण करत आहेत. जनतेपेक्षा विरोधकांना राजकारणात जास्त रस असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते

आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भारतीय जनता पक्षाचा नामोल्लेख टाळून केला आहे. मंत्री मलिक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयातील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी झाले होते.

दोन तासाच्या या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्याचबरोबर त्यांनी कोरोना संदर्भातील उपाययोजनांची माहिती देखील दिली आहे.

कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन जम्बो कोविड सेंटर तयार करण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment