पुराचा धोका! ‘या’ धरणाचे सर्व दरवाजे उघडले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-   गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. परिणामी जिल्ह्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे.

या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. तसेच मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने,

गुरुवारी रात्रीच्या सुमारास धरणाचे सर्व अकरा दरवाजे प्रत्येकी 22 इंच उघडण्यात आले आहे. धरणातून मुळा नदीपात्रात वीस हजार क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला.

रात्रभर प्रत्येक तासाला धरणाची पाणी पातळी तपासून, मध्यरात्री साडेबारा वाजता विसर्ग तीस हजार झाला आहे. आज (शुक्रवारी) पहाटे चार वाजता पुन्हा वीस हजार क्युसेकने करण्यात आला.

मुळा नदीला मोठा पूर आला असून, जायकवाडी धरणात वेगाने पाणी जात आहे. नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान नुकतेच पैठण तालुक्यातील जायकवाडी धरणाच्या 9 आपात्कालीन दरवाजांसह सर्व 27 दरवाजे आज पहाटे 4 वाजता उघडण्यात आले आहे. यामुळे जवळपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment