अन्यथा रस्त्यावर उतरू : राहुल जगताप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लादली आहे. कांदा निर्यात बंदी केल्याने कांद्याचे बाजारभाव कमी होणार असल्याने शेतकरी अडचणीत येणार असल्याने केंद्र सरकारने निर्यातबंदी निर्णय मागे घ्यावा,

अन्यथा केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार राहुल जगताप यांनी गुरुवारी दिला. नैसर्गिक अापत्तीमुळे शेतकरी अर्थिक संकटात आहे.

कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्येचा पर्याय निवडत आहे. श्रीगोंदे तालुका हा रब्बी हंगामातील कांदा लागवड व उत्पादनासाठी राज्यातील अग्रगण्य तालुक्यापैकी एक आहे.

कांद्याचे उत्पादन कमी होऊन उत्पादन खर्च वाढला. त्यातच कोरोनामुळे मार्केट बंद राहिले. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत असताना केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदीचा घेतलेला निर्णय शेतकरी विरोधी आहे.

हा निर्णय रद्द करावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप यांनी दिला.

तालुक्यातील काँगेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे वतीने याबाबत निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी राज्य उपाध्यक्ष घनश्याम शेलार, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, नगरसेवक मनोहर पोटे, हरिदास शिर्के, दीपक भोसले, स्मीतल वाबळे, राजाभाऊ लोखंडे आदी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

 

Leave a Comment