जिल्ह्याला चार मंत्रीपद मिळाले आहेत.. त्याचा उपयोग नाही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यातील कोरोनाची वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोनाबाधितांवर उपचारासाठी जिल्हाभर कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे.

दरम्यान कोविड सेंटरमध्ये रुग्णांना मिळत असलेले जेवण निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी केला आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष मुंडे म्हणाले कि, ‘जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. प्रशासकीय यंत्रणा त्याचा सामना करत आहे. परंतु प्रशासनाला जेवढे बळ पाहिजे, तेवढे मंत्र्यांकडून मिळत नाही.

कोविड सेंटरला मिळणारे शासकीय अनुदान थकले आहे. त्यामुळे कोविड सेेंटरमधील रुग्णांना जे जेवण दिले जाते, ते निकृष्ट दर्जाचे होत चालले आहे.

जेवण पुरविणार्‍या ठेकेदारांचे बिल थकल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. जिल्ह्याला चार मंत्रीपद मिळाले आहेत. त्याचा उपयोग नाही. कोरोना रुग्णाचे आणि नागरिकांचे मंत्र्यांना काहीचे देणेघेणे राहिलेले नाही. असा आरोप मुंढे यांनी केला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment