ऊसतोडणी कामगार संपावर; आता खा. शरद पवारच…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-राज्यातील ऊसतोडणी मजुरांचा तोडणी दर करार संपला आहे. त्यामुळे हा दर वाढीसंदर्भात तसेच इतर मागण्यांसंदर्भात ऊसतोडणी कामगार संघटनांनी संप पुकारला आहे.

प्रती टन किमान पाचशे रुपये दर मिळावा, मुकादमांच्या कमीशनमध्ये वाढ करावी यासह अनेक मागण्या कामगारांनी केल्या आहेत.

आता यासंदर्भात खा. शरद पवार यांनी लक्ष घालावे आणि योग्य तो मार्ग काढावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी कामगार युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ पाटील थोरे यांनी केली.

तोडणी कामगार व साखर संघाच्या अध्यक्षांची याबाबत त्यांची बैठक झाली. या बैठकीत त्यांनी ही मागणी केली. या बैठकीनंतर आम्ही शरद पवार यांचीही भेट घेऊन

ऊसतोडणी कामगारांना भरीव दरवाढ देऊन करार करण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली. ती पवार यांनी मान्य केली आहे. त्यामुळे पवार यांचाच लवाद महत्त्वाचा असेल असे थोरे म्हणाले.

मजुरांना प्रती टनाला पहिल्या किलोमीटरला किमान पाचशे रुपये मिळावेत या मागणीवर सगळ्याच संघटना ठाम आहेत. हार्वेस्टरला पाचशे रुपये देता,

मग मजुरांना का नाही असा प्रश्न तोडणी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी उपस्थित केला. सदर बैठक साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. माजीमंत्री पंकजा पालवे यांच्यासह राज्यातील ऊसतोडणी कामगार संघटनांचे प्रतिनिधी बैठकीला हजर होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment