सुजित झावरे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कारणच काय ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- केवळ जनतेचे कामे करायचे नाही म्हणूनच जिल्ह्यातील ते तीनही मंत्री कॉरन्टाइन होण्याचे वारंवार नाटक करीत असल्याची टिका करतानाच सुजित झावरे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कारणच काय ?

असा प्रश्न भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सेवा सप्ताह कार्यक्रमानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष वसंत चेडे, पदाधिकारी सुभाष दुधाडे, सुनील थोरात, बाळासाहेब नरसाळे, सागर मैड, विश्वास रोहोकले, बाळासाहेब महाडिक उपस्थित होते.

सध्या जिल्ह्यात कोरोनाची भयावह परिस्थिती आहे. मात्र, केंद्र सरकारने राज्याला मदत देऊनही ते पैसे जिल्हा व तालुका स्तरावर पोहोचत नसल्याचे सांगतच

यामुळे कोव्हिड सेंटरमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांना पीपीटी किट व मास्क देखील उपलब्ध होत नाहीत या सेंटरमध्ये निविदा धारकांचे पैसेही थकित असल्याने

बाधित रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत आहे. यासंदर्भात खासदार डॉ.सुजय विखे यांनी केलेल्या आरोपात तथ्य असल्याचेही जिल्हाध्यक्ष मुंडे यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment