या उदासीन सरकारला मराठा समाज माफ करणार नाही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :- राज्याच्या राजकारणात अनेक मराठा नेते आहे, बहुसंख्य मराठा समाजाचे आमदार सरकारमध्ये प्रतिनिधीत्व करत आहे, मंत्रिपदेही भुषवत आहेत.

परंतु आरक्षणाबाबत असलेल्या उदासिनतेमुळे ही नेतेमंडळी समाजाला न्याय देऊ शकत नाही, या उदासीन सरकारला मराठा समाज माफ करणार नाही, अशी टीका भाजपच्या प्रदेश सचिव,

माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या अनेक वर्षापासूनच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलने झाली, मोर्चे निघाले,

या प्रश्नांची तीव्रता लक्षात घेऊन मागील सरकारने हा प्रश्न गांभीर्याने घेतला, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष घालून मार्गी लावला. उच्च न्यायालयात टिकेल,

यादृष्टीने प्रयत्न केले आणि उच्च न्यायालयात टिकवलेही, ही वस्तुस्थिती जनतेसमोर आहे. परंतु या सरकारच्या काळात राज्यकर्त्यांनी हा विषयाकडे गांभीर्याने पाहिले नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.

या प्रश्नी प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेवर मात्र काही संकुचित विचाराच्या महाराष्ट्रातील नेते म्हणून मिरवणाऱ्या मंडळींनी फडणवीस ब्राम्हण म्हणून वातावरण कलुशित करण्याचा प्रयत्न केला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment