कोरोनामुळे जिल्ह्यात आणखी १६ जणांचा मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- कोरोनामुळे जिल्ह्यात आणखी १६ जणांचा मृत्यू झाला आहे. बळींची एकूण संख्या ५१६ झाली आहे. सोमवारी ४०५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 

जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत ९३, खासगी प्रयोगशाळेत ४० आणि अँटीजेन चाचणीत २७२ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा ४०, राहाता १, नगर ग्रामीण ११, नेवासे २, श्रीगोंदे ३, पारनेर ३, राहुरी १, शेवगाव १४, कोपरगाव ६, जामखेड ९, कर्जत १ आणि इतर जिल्ह्यातील २ रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत मनपा १३, संगमनेर ७, राहाता २, नगर ग्रामीण ४, श्रीरामपूर २, श्रीगोंदे १, पारनेर ३,, अकोले ३, राहुरी १, कोपरगाव २ आणि कर्जतच्या २ रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत संगमनेर ३६, राहाता ४०, पाथर्डी २६, नगर ग्रामीण २, श्रीरामपूर १, कॅन्टोन्मेंट ५, नेवासे १२, श्रीगोंदे १५, पारनेर १७, अकोले १८, राहुरी १३, शेवगाव २०, कोपरगाव २८, जामखेड २४ आणि कर्जत १५ रुग्णांचा समावेश आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment