‘एकतर नगर- मनमाड महामार्गाला ‘पायवाट’ नाहीतर माणसांना जनावरे म्हणून घोषित करा’

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-   रस्त्यांची दुरवस्था हा अहमदनगर जिल्ह्याला लागलेला शाप आहे. जिल्ह्यातील अनेक महामार्ग खराब झाले आहेत. नगर-मनमाड महामार्गाचीही अशीच दुरवस्था झाली आहे.

खड्ड्यांचा महामार्ग म्हणून या महामार्गाची आता ओळख झाली आहे. अनेक अपघातही या महामार्गावर झाले आहेत. नगरपासून ते पुढे राहुरी व शिर्डीपर्यत याची दुरावस्था झाली आहे.

अनेक आंदोलने याच्या दुरुस्तीसाठी करण्यात आली परंतु ना प्रशासनाला जाग आली कि ना लोकप्रतिनिधींना जाग आली.आता नागरिकही सोशल मीडियावरून टीका करू लागले आहेत.

सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चंगेडे यांनी तर जहरी शब्दात रस्त्यावर टीका केली आहे. रस्त्यावरचा चिखल पाहूत ते म्हणाले, एक तर महामार्गाला पायवाट म्हणून घोषित करा अथवा माणसांना जनावरे तरी.

कारण या रस्त्यावरून माणसे नव्हे तर जनावरेच चालू शकतात, इतकी भयाण अवस्था आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतात जाण्यासाठी डांबरी रस्ते तयार झाले आहेत.

मात्र महामार्गाला पायवाटीचे स्वरुप आले आले. या रस्त्यावर अनेकजण सोशलवरून प्रशासनाची खिल्ली उडवत असल्याचे पहायला मिळत आहे.

दरम्यान नुकतेच रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या कारभारावर टीका केली.रोडवर पडलेल्या खड्ड्यात युवकांनी आपले डोक्याचे केस काढून मुंडण आंदोलन केले होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment