आरोग्यमंत्र्यांची भेट घेत आमदार जगतापांनी केली ही मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा फैलाव वेगाने होत आहे. त्यात उपचारादरम्यान रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण देखील वाढले. या आजारातील रुग्णांना श्‍वसनाचा अधिक त्रास होतो. उपचारासाठी रेमडेसिवीर औषध प्रभावी ठरते. 

अहमदनगर जिल्ह्यातील या औषधाचा साठा संपला आहे. त्यामुळे तो तत्काळ मिळावा, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे.

आमदार जगताप यांनी आरोग्यमंत्री टोपे यांची मुंबई येथे भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. आ. जगताप म्हणाले कि, जिल्हा शल्यचिकित्सकांनी रेमडेसिवीर औषध साठा संपल्याचे सांगितले आहे.

खाजगी रुग्णालयांकडे देखील हे औषध उपलब्ध नाही. या औषधासाठी संसर्ग झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होते. रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी हे औषध गरजेचे असून, ते तत्काळ मिळावे.

याशिवाय राज्यातील इतर जिल्ह्यांना मोठ्याप्रमाणात रेमडेसिवीर हे औषध मिळते. त्या तुलनेत हे औषध अहमदनगर जिल्ह्याला मिळत नाही.

याकडे देखील आमदार जगताप यांनी लक्ष वेधले. आरोग्यमंत्री टोपे यांनी या निवेदनाची दखल घेत आरोग्य विभागाचे सचिव यांना तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment