अतिवृष्टीने 17 कुटुंबे पाण्यात; आश्रय दिला तरी दैना संपेना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अनेकठिकाणी या पावसाच्या पाण्याचा फटका नागरिकांना बसला आहे.

मागील काही सततच्या पावसाने राहाता तालुक्यातील रुई येथील सुमारे सतरा आदिवासी कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे. रुई गावठाण हद्दीतील सेवा सहकारी सोसायटीच्या मागील बाजुला सदर आदिवासी कुटुंब गेल्या 25 वर्षांपासून वास्तव्यास आहे.

तेथे ते झोपड्या करून राहतात व स्थानिक शेतकर्‍यांच्या शेतात मजुरी करत आहेत. आता या पावसाने त्यांचा संसार पाण्यात गेला असून सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना ग्रामपंचायत मंगल कार्यालयातील इमारतीत हलवण्यात आले आहे.

‘सर्व संसार पाण्यात बुडाले आहेत. धान्य पाण्यात भिजले अंगावरच्या कपड्यावर आम्ही लहान मुलं घेऊन बाहेर पडलो. ग्रामपंचायतीने मंगल कार्यालय उघडून दिले तर तिथे चूल पेटवू नका तरच रहा असे सांगितले.

हाताला काम नाही तर गॅस कुठून भरून आणायचा. त्यामुळे आम्हाला सर्व सुविधा शासनाने पुरवाव्यात’ अशी मागणी या आदिवासी कुटुंबांनी केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment