धक्कादायक! ‘ह्या’उपबाजारात समितीत वजन काट्यात अफरातफर ;शेतकऱ्यांना चुना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-   शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा आणि शेतकऱ्यांच्या मालाला उठाव मिळावा यासाठी बळीराजा आपला माल बाजार समितीमध्ये आणत असतो.परंतु या बाजारसमितीमध्येच शेकऱ्यांस चुना लावत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

श्रीरामपूर बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजार आवारात असलेल्या मोठ्या इलेक्ट्रॉनिक काट्यात वजनात अफरातफर होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मापात पाप करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, न संचालक नानासाहेब पवार यांनी हा काटा तात्पुरता बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी: मंगळवारी खिर्डी येथील सेवा संस्थेचे चेअरमन शनैश्वर पाराजी पवार यांनी आपल्या शेतात तयार झालेली सोयाबीन उपबाजारातील आडते व्यापारी जितेंद्र मिरीकर यांच्याकडे विक्रीसाठी आणली होती.

साधारण 20 क्विंटल वजन येईल, असा त्यांचा अंदाज होता. उपबाजार समितीच्या मोठ्या वजन काट्यावर याचे वजन 1 टन 670 किलो आल्याने पवार यांना वजनात तफावत असल्याची शंका आली.

त्यांनी लगेच ते सोयाबीन विक्री केलेल्या आडत्याच्या आडतीवर मोजमाप केले असता त्या सोयाबीनचे वजन 1 टन 908 किलो आले.

त्यामुळे पवार यांना 238 किलोचा फटका बसला आहे. त्यामुळे आता बाजार समिती या काटा ठेकेदाराकडे दुर्लक्ष करीत आहे की सेटींग करतात याबाबत संभ्रम आहे.

त्यामुळे बाजार समितीने शेतकर्‍यांची लूट थांबवावी. शेतकर्‍यांना चुना लावणार्‍या काट्याच्या ठेकेदाराची चौकशी करावी अशी मागणी पवार यांनी केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment