निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत द्या’

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-अतिवृष्टीमुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या नुकसानीची दखल घेऊन निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी,

अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी मदत, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, मका, कापूस आदी उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

कोरोना संकटामुळे शेतमालाला अपेक्षित दर मिळत नसताना शेतकऱ्यांनी अतिशय आव्हानात्मक परिस्थितीत खरीप हंगामाची पिके उभी केली होती.

अनुकूल हवामान व वेळेवर झालेल्या पर्जन्यमानामुळे भरघोस उत्पन्न मिळेल अशी परिस्थिती होती. मात्र, अतिवृष्टीमुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment