ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमले, पण होतेय ‘असे’ काही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपलेला असूनही निवडणूक घेता येणार नसल्याने गामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले आहेत.

यावरुनही खूप राजकारण झाले. जे जिल्ह्याने पहिले आहे. परंतु आता या प्रशासकांची नेमणूक ग्रामपंचायत विकासात अडथळे आणत असल्याचे चित्र उभे राहिले आहे.

आधीच कामात व्यस्त असलेल्या प्रशासकांनी गावात कोणत्याही प्रकारच्या योजनांना सुरूवात केली नसून ग्रामपंचायतीच्या विकासाला खीळ बसत आहे.

जुलै 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींची मुदत संपणार असल्याने त्याठिकाणी शासकीय अधिकार्‍यांचीच नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले त्यानंतर

या ठिकाणी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, कृषी अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी तसेच एकात्मिक बालविकास प्रकल्पातील पर्यवेक्षिकांची नियुक्ती करण्यात आली.

या अधिकार्‍यांनी गावात जाऊन पदभार स्वीकारला आहे. मात्र, त्यानंतर गावात प्रशासक फिरकलेच नसल्याच्या तक्रारी आता ग्रामस्थांकडून ऐकायला मिळत आहेत.

ग्रामस्थांची अनेक कामे रखडली आहेत. त्यामुळे गावाच्या विकासाला खीळ बसली असल्याने निवडणूक लवकरात लवकर घ्यायला हवी, अशी मागणी अनेकांकडून आता होऊ लागली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment