अहमदनगर जिल्ह्यात पेरण्या लांबल्या; बळीराजा चिंतेत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- मागील काही दिवसांपासून जिल्ह्या पाऊस पडत असल्याने रबी पिकांच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. वावरांमध्ये पाणी साचले असल्याने पेरणी करणे अशक्य झाले आहे.

जिल्ह्यात मुख्यत: धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. धानपीक निघाल्यानंतर तसेच सिंचनाची सुविधा नसलेल्या वावरात काही शेतकरी रबी पिकांची लागवड करतात. रबी पिकांमध्ये प्रामुख्याने उडीद,

हरभरा, ज्वारी, मका, गहू आदी पिकांचा समावेश आहे. या पिकांची पेरणी प्रामुख्याने ऑक्टोबर महिन्यात सुरु केली जाते. परंतु अहमदनगर जिल्ह्यामधील अनके तालुक्यांमध्ये पाऊस पडत असल्याने

रब्बी हंगामासाठी पेरण्या खुपच लांबत चालल्या असल्याने शेतकर्‍यांना चिंता वाढली आहे. यावर्षी पावसाने सरासरी केव्हाच ओलांडली. सर्वच नक्षत्र मनशोक्त बरसली आजही सप्टेंबर महिना संपत आला तरी पाऊस थांबण्याचे नाव घेईना.

महाराष्ट्रात सप्टेंबर -ऑक्टोबरमध्ये मान्सून परतीच्या प्रवासावर असतो; परंतु चालू वर्षी अजूनही धो-धो कोसळत आहे. त्यामुळे ज्वारी पिकाच्या पेरण्या चांगल्याच पुढे लांबत चालल्या आहेत.

साधारणपणे गोकुळ अष्टमीनंतर ज्वारी पेरणीला सुरुवात होते; परंतु सततच्या पावसाने बाळीराजाचे वेळापत्रक बिघडले आहे.

सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये ज्वारी पिकाची कोळपणी, खुरपणी चालू असते परंतु आज घडीला अजून पेरण्याच नाहीत व अजूनही लवकर होण्याचे चिन्ह दिसत नाही. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment