राजकारणाच्या वेळी राजकारण करू – माजी आमदार वैभव पिचड

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- राज्यातील आदिवासी कोरोना संकटामुळे बेरोजगार झाला आहे. राज्य सरकारने ग्रामपंचायतींना केंद्राने दिलेला करोडो रुपयांचा विकास निधी परत घेतला असल्याने ग्रामपंचायतीकडे वसुली थांबल्याने या संस्था अडचणीत आल्या आहेत.

अकोला तालुक्यात सर्वपक्षीय बैठका घेऊन आघाडीच्या माध्यमातून केवळ तहसीलदार व अधिका-यांना आदेश देण्यापेक्षा राज्य सरकारकडून निधी कसा आणता येईल. याकडे लोकप्रतिनीधींनी लक्ष द्यावे.

असा सल्ला आमदार वैभव पिचड यांनी दिला आहे. राजकारण राजकारणाच्या वेळी करू. पण आज लोक मरणाच्या दारात उभे असताना राज्य सरकार एक छदामही देत नसेल,

तर तुम्हाला ग्रामपंचायतींना बोलण्याचा अधिकारच नाही. राजूर व अकोल्यामध्ये, ‘मी कोव्हीड केंद्र सुरु करतो’ आरोग्य विभागाने त्यासाठी लागणारे आरोग्य कर्मचारी द्यावेत. जिल्हाधिकारी, सिव्हिल सर्जन यांना पत्रव्यवहार करूनही त्याचे उत्तर नाही. असे वकत्व्य माजी आमदार वैभव पिचड यांनी केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment