जिल्ह्यातील या तालुक्यात विषारी सापांची दहशत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आधीच हतबल झालेला शेतकऱ्याचे पीक त्याच्या डोळ्यादेखत वाया गेले. पावसाचे संकट संपते तोच रानटी जनावरे व पक्ष्यांनी पिकाचे नुकसान सुरु केले यामुळे पुन्हा एकदा शेतकरी चिंतेत पडला.

मात्र आता एक नवीनच संकट शेतकऱ्यांसमोर येऊन उभे राहिले आहे. गेल्या काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्या व रानडूकराची मोठी दहशत आहे.

त्यातचं आता दिवसेंदिवस मोठ्या संख्येने विषारी नाग, साप आढळून येत असल्याने बिबट्यानंतर आता विषारी नागाची भर पडल्याने सर्वसामान्यांसह शेतकरी वर्गाचा जीव टागणीला लागला आहे.

आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, उंबरी बाळापूर, शेडगाव, मालुंजे, शिबलापूर, वरंवडी, दाढ, प्रतापपूर, सोनगाव, पिप्रीं, खळी, पानोडी आदिसह पंचक्रोशीतील गावांमध्ये मोठ्या संख्येने नाग आढळून आल्याची

माहिती स्थानिक सर्पमित्र शिवा पवार यांनी दिली. मागील दोन महिन्यात लहान मोठे 50 ते 55 विषारी नाग, 4 मणियार आदीसह धामण, कवड्या, तस्कर असे बिनविषारी सर्प पकडून निसर्गात मुक्त केल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे हे विषारी नाग थेट वर्दळीची ठिकाणे असलेल्या घरांमध्ये आढळून येत

असल्याने नागरीकांमध्ये भिती वाढली आहे. दरम्यान रात्री अपरात्री शेतकर्‍यांना शेतात जावे लागत असल्याने शेतकर्‍यांचा जीव ही टागणीला लागला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment