अनिलभैयांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :- नगर शहरात माजी मंत्री अनिल राठोड यांच्या निधनानंतर पक्षातील गटबाजी उफाळून आली आहे.

दोन गट एकमेकांना पाण्यात पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाचे ज्येष्ठ व अनुभवी नेते अंबादास पंधाडे यांनी दोन्ही गटांना एकत्र येण्याची साद दिली आहे. अक्षरश: रक्त सांडून कडव्या शिवसैनिकांनी नगर शहरात पक्ष रूजवला.

आज पक्षात दुफळी निर्माण झाली आहे. अनिलभैयांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर पक्ष पुन्हा त्याच दिमाखात पक्ष उभा केला पाहिजे. गटबाजी अशीच कायम राहिली तर पक्षच नामशेष होण्याचा इशाराही पंधाडे यांनी दिला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment