मोदी-योगी सरकार असंवेदनशील; तांबेंचा आरोप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :-  हाथरस घटनेप्रकरणी काँग्रेसने आज नगर शहरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर बसून बैठा सत्याग्रह केला. आ.डॉ.सुधीर तांबे यांनी या सत्याग्रहाचे नेतृत्व केले. आ. तांबे म्हणाले, हाथरसमध्ये घडलेली घटना ही अत्यंत अमानवी आहे.

क्रूर आहे. या घटनेमध्ये मोदी – योगी सरकार बेजबाबदारपणे वागत आहे. कुठली ही संवेदनशीलता या सरकारमध्ये उरलेली नाही. सरकार पीडितेच्या कुटुंबीयांनी भेटू देत नाही.

चार दिवस झाले तरी एफआरआय घेत नाही. बलात्कार झालाच नाही असा दावा भाजप करत आहे. यावरून या प्रकरणाबद्दलच्या भाजपच्या भावना काय आहेत हे उघडे पडले आहे.

या सत्याग्रह प्रसंगी श्रीरामपूरचे आ. लहु कानडे, अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, अहमदनगर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, जेष्ठ नेते दीप चव्हाण,

अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, विद्यार्थी शहर जिल्हाध्यक्ष दानिश शेख, पारनेर तालुका अध्यक्ष संभाजीराव रोहोकले, शेवगाव तालुका अध्यक्ष अमोल फडके आदी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment