ग्रामपंचायतीच्या प्रशासकाचा बसेना ‘मेळ’ ; गावविकासाला खीळ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपलेला असूनही निवडणूक घेता येणार नसल्याने गामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. यावरुनही खूप राजकारण झाले.

जे जिल्ह्याने पहिले आहे. परंतु आता या प्रशासकांची नेमणूक ग्रामपंचायत विकासात अडथळे आणत असल्याचे चित्र उभे राहिले आहे. आधीच कामात व्यस्त असलेल्या प्रशासकांनी गावात कोणत्याही प्रकारच्या योजनांना सुरूवात केली नसून ग्रामपंचायतीच्या विकासाला खीळ बसत आहे.

ग्रामपंचायतींची ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाच वर्षांची मुदत संपल्याने शासनाने ग्रामपंचायतीवर शासकिय अधिकारी-कर्मचारी प्रशासक म्हणून नियुक्त केले आणि गावपातळीवर सरपंच, सदस्यांचा दबदबा संपला. ग्रामस्थांची कामे मार्गी लावण्यात सरपंच प्रभावी भूमिका बजावत असत. त्यामुळे ग्रामसेवक ग्रामपंचायतीकडे महिनोगणती फिरकत नसले,

तरीही सरपंचच वेळ मारून कामे पुढे रेटून नेत असत. मात्र आता ग्रामसेवकासह प्रशासकही शहरवासी होऊन ते ये-जा बहाद्दर झाल्याने परिणामी त्यांच्या दौर्‍याचा ताळमेळ अजूनही बसलेला नाही. आठवड्यातून ग्रामसेवक निवडक दिवशी येतात. प्रशासक तर कधी येतात हे समजतही नाही.

प्रशासकांनी ग्रामसेवकांना तुम्हीच सांभाळून घ्या असे म्हणत सर्वाधिकार दिल्याचे काही अंशी दिसून येत आहे. प्रशासकपदी मुख्याध्यापक, विस्तारधिकारी, शाखा अभियंते, कृषी सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक, केंद्र प्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षिकाची वर्णी लागली आहे.

यातील बहुतांशी प्रशासक हे तालुक्याच्या ठिकाणाहून अथवा अन्य मोठ्या शहरातून संबंधीत गावात ये-जा करत असल्याने आता ग्रामस्थाना सरकारी कामांसाठी तालुक्याला किंवा इतर ठिकाणी जावे लागते. कामासाठी प्रशासक यांचा शोध घ्यावा लागतो. तेथेही ते भेटतील याची शाश्वती नसते.

त्यांच्याशी संपर्क साधल्यास दौर्‍यावर किंवा दुसर्‍या गावांत असल्याचे उत्तर मिळते. जुलै 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींची मुदत संपणार असल्याने त्याठिकाणी शासकीय अधिकार्‍यांचीच नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले त्यानंतर या ठिकाणी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी,

कृषी अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी तसेच एकात्मिक बालविकास प्रकल्पातील पर्यवेक्षिकांची नियुक्ती करण्यात आली. या अधिकार्‍यांनी गावात जाऊन पदभार स्वीकारला आहे. मात्र, त्यानंतर गावात प्रशासक फिरकलेच नसल्याच्या तक्रारी आता ग्रामस्थांकडून ऐकायला मिळत आहेत.

ग्रामस्थांची अनेक कामे रखडली आहेत. त्यामुळे गावाच्या विकासाला खीळ बसली असल्याने निवडणूक लवकरात लवकर घ्यायला हवी, अशी मागणी अनेकांकडून आता होऊ लागली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment