शेतकऱ्यांना दिलासा; आढळाचे पाणी आणले रोहित ओढ्यात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा कामाचा धडाका आणि त्यांची कर्तव्यतत्परता सर्वांनाचं माहित आहे. त्यांच्या कामाच्या धडाक्याने त्यांनी आजपर्यंत अनेक काम मार्गी लावले आहेत.

आता महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या मदतीने आढळा नदीचे ओव्हरफ्लोचे पाणी सतराशे फूट लांब व दोनशे फूट व्यासाच्या पाईपलाईनद्वारे चिकणी परिसरातील रोहित ओढ्यात सोडण्यात आले आहे.

त्यामुळे परिसरातील शेतकरी सुखावला आहे. यामुळे या परिसरातील शेती व शेतकर्‍यांना मोठा फायदा होणार असून पाणीपातळी वाढली आहे. या प्रसंगी इंद्रजीत थोरात म्हणाले की, यावर्षी राज्यासह संगमनेर तालुक्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे.

अनेक ठिकाणी वाहून जाणारे पाणी आपण इतरत्र वळवल्याने त्या पाण्याचा जास्तीत जास्त लाभ आपल्या परिसरातील शेतकर्‍यांना होणार आहे. त्याचप्रमाणे या भागातील पाणी पातळीची वाढ होणार आहे. नामदार बाळासाहेब थोरात यांनी प्रत्येक ओढ्यावर नदीवर सिमेंट बंधार्‍यांची साखळी निर्माण केली असून

त्यामुळे तालुका जलसंधारणाचे मोठे काम झाले आहे. यावर्षी पाणी पाऊस चांगला आहे त्यामुळे हे पाणी जास्तीत जास्त घेऊन शेतकर्‍यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्याकडे लक्ष दिले पाहिजे व उर्वरित भागातही पाणी कसे पोहोचता येईल यासाठी कारखान्याच्या माध्यमातून नियोजन केले जात असल्याचेही ते म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment