आठ दिवसात काम सुरु न केल्यास जनआंदोलन करणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- शहरासह जिल्ह्यातील खड्डे व नादुरुस्त रस्ते हे सध्या चांगलेच गाजत आहे. यामुळे दरदिवशी जिल्ह्यात आंदोलने, निदर्शने, रस्तारोको करण्यात येत आहे.

संगमनेर तालुक्यातील कोल्हार घोटी राज्यमार्गावरील असंख्य खड्ड्यांमुळे या राज्यमार्गाची दुरवस्था झाली आहे. यामुळे यामार्गावरील प्रवाशांचे हाल होत असल्याने, दुरुस्तीची मागणी होत आहे.

संगमनेर भाजपाच्यावतीने याबाबत कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा झाली असून, आगामी आठवड्याच कामाला सुरवात होणार असल्याची माहिती प्रसिध्दी पत्रकातून दिली आहे.

या नादुरुस्त रस्त्यांवर मध्यंतरीच्या काळात डागडुजीचा मुलामा देण्यात आला होता. तोही सप्टेंबर अखेरीच्या पावसाने उखडला आहे. या संदर्भात भाजपने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंताशी संपर्क केला.

त्यांनी पुढील आठ दिवसात खड्डे बुजविण्याचे काम सुरु करण्याची तसेच दसऱ्या पासून डांबरीकरण करण्याची ग्वाही दिली आहे.

त्याचप्रमाणे संगमनेर अकोले या रस्त्याची दुरुस्ती करणार असल्याची माहिती दिली आहे. या रस्त्यावरील शहापूर ते राजूर पर्यंत नवीन डांबरीकरण पूर्ण होत आले असून,

आता संगमनेर ते अकोले डांबरीकरणाची सुरवात करण्यात येणार असल्याचे सांगितले.हे खड्डे बुजविण्याची कामे त्वरित सुरु न केल्यास एक मोठे जनआंदोलन करणार असल्याचा इशारा भाजपाने दिला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment