महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला सुरक्षित नाही; भाजपने केले आंदोलन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :-  भाजपच्या महिला आघाडीच्यावतीने राज्यातील विविध भागात महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ दिल्लीगेट वेशीजवळ धरणे आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.

यावेळी भाजपाच्या सुरेखा विद्ये म्हणाल्या, महाराष्ट्रात आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत. कोविडच्या महामारीतही राज्यातील महिलांवरील अत्याचार थांबलेले नाहीत,

कोव्हीड सेंटरमध्ये कोरोना बाधित मुलीवर अत्याचार होत आहेत. राज्यातील महिलांवरील अत्याचार थांबण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आंध्रप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही नवीन कायदा करण्याचे जाहीर केले होते,

मात्र अद्याप निर्णय घेतला नाही. महिलांवरील जे अत्याचार होत आहेत. याची साधी दखलही हे सरकार घेत नाही. मग या आघाडी सरकारचा आपल्याला उपयोग काय? अत्याचारित महिलांनी दाद मागायची कोणाकडे.

म्हणून आम्ही शहर व जिल्हा भाजपा महिला आघाडीच्यावतीने महिला सुरक्षेचा नवीन कायदा त्वरित लागू करण्याची मागणी राज्य सरकारकडे करत आहोत.

यावेळी अश्विनी थोरात, जिल्हा सरचिटणीस सुरेखा विद्ये, सरचिटणीस वंदना पंडित, कॅन्टों.सदस्या शुभांगी साठे, माजी नगरसेविका संगीता खरमाळे, प्रिया जानवे, नगरसेविका पल्लवी जाधव,

पंचायत समिती सदस्या स्वाती कराळे, अरणगावच्या सरपंच स्वाती गहिले, रेश्मा शेख, नंदा चाबुकस्वार, अर्चना चौधरी, मनिषा गहिले, ज्योत्स्ना मुंगी, संगीता मुळे आदि महिला पदाधिकार्यांसह भाजपा शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे,

ज्येष्ठ नेते वसंत लोढा, अजय चितळे, महेश तवले, विवेक नाईक, अनिल गट्टाणी, तुषार पोटे, राजेंद्र विद्ये आदिंसह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment