आर्थिक मदतीविना कोरोना योद्धांचे कुटुंबीय आले अडचणीत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- जगभर सुरु असलेल्या कोरोना महामारीमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. या महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून कोरोनाबाधितांसाठी झटणाऱ्या व परिणामी प्राणाला मुकणाऱ्या कोरोना योद्ध्यांचे कुटुंब आर्थिक मदतीविना अडचणीत सापडले आहे.

कोरोना संकटात महापालिका कर्मचाऱ्यांनी अहोरात्र नागरिकांना सहकार्य केले. यात महापालिकेच्या तीन कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांच्या वारसांना सुरक्षा कवच विमा योजनेतून 50 लाख रुपये मिळणे अपेक्षित होते.

मात्र, प्रशासकीय लालफितीच्या कारभारात मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांची मदत अडकली आहे. महापालिकेच्या शंभराहून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील तिघांचा मृत्यू झाला.

त्यास आता दोन महिने होत आले असताना, महापालिका प्रशासनाने मृतांच्या नातेवाईकांना मदत मिळावी, यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविलेला नाही.

मृतांच्या नातेवाईकांना महापालिकेने दोन वेळा पत्र पाठवून वारस प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले. मात्र, तहसील कार्यालयाकडून हे प्रमाणपत्र मिळत नव्हते.

अखेर काल (ता.12) तहसील कार्यालयाकडून मृतांच्या नातेवाईकांना वारस प्रमाणपत्र मिळाले. हे प्रमाणपत्र आज महापालिकेत सादर करण्यात आले.

हे प्रमाणपत्र जोडून महापालिका आता सरकारकडे प्रस्ताव पाठविणार आहे. नगरविकास, आरोग्य व वित्त विभागाकडून हा निधी येईल.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment