जलयुक्त शिवाराच्या चौकशीबाबत माजी पालकमंत्री काय म्हणाले पहा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- राज्यातील ठकरे सरकारने युती सरकारच्या काळातील महत्वकांक्षी योजना जलयुक्त शिवार बाबत चौकशीचे आदेश दिले आहे. या योजनेची एसआयटीमार्फत चौकशी होणार असल्याचे नुकतीच जाहीर करण्यात आले आहे.

या योजनेच्या अनुषंगाने नगर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि माजी जल संसाधन मंत्री राम शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

प्रा.राम शिंदे यावेळी म्हणाले कि, आमच्या सरकारच्या काळात जलयुक्त शिवार योजना ही एक महत्वाची योजना होती. या योजेतर्गत आम्ही राज्यातील गावपातळीवर कामे केली आहे.

या कामाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा देण्याचे काम आम्ही केले. मात्र आता जे कॅगचा अहवाल आला आहे त्यामध्ये कॅगने काय सांगितले आहे याकडे आपण लक्ष दिले पाहिजे.

कॅगने आपल्या अहवालात फक्त सूचना केली आहे, कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप केला नाही. मात्र या सरकारला फक्त आणि फक्त राजकारण करायचे आहे आणि लोकहिताची कामे बंद करायचे आहे.

असा टोला शिंदे यांनी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे. यावेळी शिंदे यांनी सरकारला विनंती करत म्हणाले कि, सरकारने राजकारण सोडून लोकहिताच्या काम करावे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment