पाण्याची पातळी नाही पण भ्रष्टाचार वाढला; कॅग अहवालावर पालकमंत्र्यांची प्रतिक्रिया

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-राज्यातील ठकरे सरकारने युती सरकारच्या काळातील महत्वकांक्षी योजना जलयुक्त शिवार बाबत चौकशीचे आदेश दिले आहे. या योजनेची एसआयटीमार्फत चौकशी होणार असल्याचे नुकतीच जाहीर करण्यात आले आहे.

याबाबत नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आपले मत व्यक्त केले आहे. भाजप सरकारच्या काळात जलयुक्त शिवार योजनेत कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. या अभियानामुळे गावागावातील पाण्याची पातळी तर वाढलीच नाही.

त्यात भ्रष्टाचार मात्र जोरात झाल्याचा थेट आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. यासंदर्भात मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णया नुसार या अभियानाची खुली चौकशी होणारच आहे.

शिवाय गेल्या पाच वर्षात हायब्रीड ॲन्युटी योजनेंतर्गत झालेल्या रस्ते प्रकल्पांचीही चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तसेच यावेळी बोलताना पालकमंत्री मुश्रीफ यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर कडाडून टीका केली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील जलशिवार योजनेत लोकसहभाग असल्याचे सांगत असले तरी शासनाच्या दहा हजार कोटी निधीवर डल्ला मारल्याचा गंभीर अहवाल कॅगने दिला आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळाने या अभियानाची खुली चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याचे मंत्री मुश्रीफ म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment