फडणवीसांच्या बदनामीसाठी सरकारकडून ‘त्या’ चौकशीचे आदेश; भाजप पदाधिकाऱ्याचा आरोप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता.

या निर्णयानंतर राज्य सरकारच्या विरोधात भाजप चांगलेच आक्रमक झाले आहे. भाजपचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य प्रा. भानुदास बेरड यांनी ‘नगर तालुक्यातील मांडवा या गावी जलयुक्त शिवार योजनेतून ज्या तलावाचे काम झाले, त्याला भेट दिली.

यावेळी काही शेतकरी उपस्थित होते. या योजनेच्या कामातून झालेल्या तलावाची परिस्थिती दाखवत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

‘राज्य सरकार हे केवळ देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर आरोप करीत आहे,’ अशी टीकाही त्यांनी केली आहे. बेरड यांनी जलयुक्त शिवार योजनेच्या काम केलेल्या तलावाला भेट दिली.

यावेळीच या योजेनबाबत सांगणारा व्हिडिओ बनवत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. बेरड म्हणाले कि, या तलावामध्ये साठलेल्या पाण्यामुळे या गावातील जमीनीची भूजल पातळी वाढणार आहे.

पर्यायाने विहिरींना पाणी येईल, व या परिसरातील सर्व शेती बारामहिने बागायती होईल, अशा प्रकारचे मोठे काम जलयुक्त शिवारमुळे झाले आहे.मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकारला स्वतःला काही करता येत नाही,

त्यामुळेच ते देवेंद्र फडणवीस यांच्या काळात यशस्वीपणे राबवलेल्या महाराष्ट्रातील जलयुक्त शिवार योजनेवर आक्षेप घेण्याचे काम करीत आहेत. फडणवीस यांना बदनाम करण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर आरोप केले जात आहेत.

कॅगच्या अहवालात जो उल्लेख आहे, त्यात त्यांनी जलयुक्त शिवाराच्या गावांना भेटी दिल्या नाहीत. सध्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याची गरज आहे. मात्र, सरकार त्याकडे दुर्लक्ष करून केवळ जलयुक्त शिवाराची चौकशी लावत असून त्याचा आम्ही निषेध करतो.’

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment