उशिरा का होईना पण तलाव पूर्ण क्षमतेने भरला ; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यात सर्वदूर तलाव नद्या, नाले, ओढे, धरणे हे पूर्ण क्षमतेने भरलेले आहे.

यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांमध्ये एक समाधानाचे वातावरण आहे जिल्ह्यातील दक्षिणेकडील भागास नेहमीस दुष्काळ ग्रस्त म्हणून संबोधले जात असत.

मात्र यंदाच्या वर्षी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तलाव देखील पूर्ण क्षमतेने भरलेले आहे.

पाथर्डी तालुक्यातील चिंचपुर पांगुळ येथील वडगांव आणि चिंचपुर पांगुळ, ढाकनवाडी या गावांच्या सीमेवर असलेला बेलपारा मध्यम प्रकल्प तलाव यावर्षी पूर्ण क्षमतेने भरला आहे.

मुसळधार पावसामुळे तलावाच्या सांडव्यावरून पाणी जोरदार वाहू लागले आहे. मागील काही वर्षे हा तलाव पावसाअभावी पूर्ण भरत नव्हता. यावर्षी हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.

सलग चार वर्षे तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला नव्हता. दुष्काळामुळे तसेच मोठ्या प्रमाणात पाणी उपसा झाल्यामुळे तलाव कोरडा पडला होता.

मात्र यावर्षी सुरवातीपासून चांगला पाऊस पडत असल्याने उशिरा का होईना पण तलाव पूर्ण क्षमतेने भरल्या आहे. या वातावरणामुळे परिसरातील शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.

जिल्हा हद्दीवरील अनेक गावांच्या नागरिकांनी यावेळी सांडव्यवरील पाणी पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. चिंचपूर तलाव भरल्यानंतर सांडव्यावरून वाहणारे पाणी दुष्काळी शिरूर तालुक्यातील लोकांना पर्वणीच असते .

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment