पंचनामे करण्यात वेळ न घालता निकषाप्रमाणे सरसकट नुकसान भरपाई द्यावी – आमदार मोनिका राजळे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- यंदा महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली आहे. या सर्व पूर परिस्थीतीमुळे व अती पावसामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल, फळबाग, घरे, संसार उपयोगी साहित्य, दुभती जनावरे, पाण्याखाली जावून मोठी हानी झालेली आहे.

अनेक जिल्ह्यातील गावे जलमय होऊन गावांचे शिवार पाण्याखाली जावून, यात खरिपाची पिके, ऊस, फळबागा भुईसपाट होऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे करण्यात वेळ न घालता निकषाप्रमाणे सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार मोनिका राजळे यांनी केली.

शेवगाव-पाथर्डी मतदार संघातही मान्सूनचा पाऊस मोठ्या प्रमाणात होऊन आता परतीच्या अती पावसामुळे, शेतकऱ्यांच्या शेतातील सर्व पिके पाण्याखाली जावून पिकांचे संपूर्ण नुकसान झाले. पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील सर्व महसूल मंडळामध्ये अती पाऊस, वादळ, यामुळे शेतमाला बरोबर घरांचे नुकसान, जनावरे वाहून जाणे,

मृत्यू पावणे असे नुकसान झाले. डोळयासमोर सडणारी पिके व पिकांची माती झालेली पाहणे शेतकऱ्यांच्या नशिबी आले आहे. त्यामुळे शेतीच निकामी झाली आहे, तर मग पंचनामे कशाचे करणार? त्यामुळे शासनाने पंचनामे करण्यात वेळ न घालता, सरसकट विना अट शेतकऱ्यांना मदत देणे गरजेचे आहे.

त्यामुळे शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या निकषाप्रमाणे, सरसकट सर्वच शेतकऱ्यांना विना अट नुकसान भरपाई देऊन मदत करणे गरजेचे आहे. त्याकरिता शासनाने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार मोनिका राजळे यांनी केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment