ऐन सणासुदीच्या काळातच पाच दिवसांपासून पाणी नाही !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- गेल्या चार-पाच दिवसांपासून ऐन सणासुदीच्या काळातच छावणी परिषद प्रशासनाकडून भिंगार गावात पाणीपुरवठा होऊ शकला नाही. परिणामी नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

भिंगारला पाणीपुरवठा करणारे मुळाधरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.जास्तीचे पाणी नदी पात्रात सोडले असले तरी पाणी प्रश्न निर्माण झाला आहे.

पाणीप्रश्नी आजी, माजी खासदार,आमदार यांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा करूनही तो अद्याप सुटलेला नाही.पाणीप्रश्नाचे मुळ कुठे आहे याचा अद्याप शोध लागलेला नाही.

सुरुवातीला रोज सकाळ-सायंकाळ पाणीपुरवठा व्हायचा. त्यानंतर तो रोज एकवेळपर्यंत आला. मध्यंतरी तो दिवसाआड होऊ लागला.

त्यानंतर तो दोन दिवसातून एकदा होऊ लागला आतातर आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा होत असल्याने जनता त्रस्त झाली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment