एकरी ५० हजारांची भरपाई द्या : डॉ. अजित नवले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-परतीच्या पावसाने कापणी करून ठेवलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भ, मराठवाड्यात कापूस, पश्चिम महाराष्ट्रात ऊस व द्राक्षपिकाचे, तर कोकणात भाताचे नुकसान झाले.

खरीप हंगामातील ३० टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. तातडीने पंचनामे करून एकरी किमान ५० हजार रुपये भरपाई देऊन शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा.

केंद्र सरकारने तातडीने पथक पाठवून आपत्ती सहाय्यता निधीतून राज्य सरकारला पुरेशी मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मार्क्सवादी किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केली.

राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले असले, तरी कार्यवाही संथ गतीने सुरू आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेतील तरतुदीनुसार भरपाई मिळण्यासाठी सरकारी यंत्रणांनी सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे.

मोबाइल उपलब्ध नसल्यास कृषी विभाग, विमा कंपनीचे ऑफिस किंवा बँकेत आवश्यक कागदपत्रे जोडून भरपाईसाठी दावा करावा, असे आवाहन डाॅ. नवले यांनी केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment