मागील महिन्यात अतिवृष्टीने जिल्ह्यातील ६४ हजार हेक्टरचे नुकसान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- अतिवृष्टीने पाणी टंचाईचे संकट टाळले खरे मात्र, या पावसाने खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाला. जिरायत, बागायत क्षेत्रासह फळ पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.

सप्टेंबरअखेरीस पंचनाम्याच्या अहवालानुसार जिल्ह्यातील ६३ हजार ८०८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून,तब्बल १ लाख १६ हजार ६३८ शेतकरी बाधित झाले आहेत.

या शेतकर्‍यांना  नुकसानभरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने ५८ कोटी ९० लाख रुपयांची मागणी सरकारकडे केली आहे. दरम्यान,अतिवृष्टीमुळे ऑक्टोबर महिन्यात झालेल्या

नुकसानीचे पंचनामे सुरु असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांनी दिली. मागील १८ वर्षाचे रेकॉर्ड ब्रेक करीत यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला.

या पावसाने सप्टेंबरअखेरपर्यत जिल्ह्यात जवळपास ६४ हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप तसेच बागायती पिकांचे नुकसान झाले आहे. जिरायती क्षेत्रातील ४० हजार ८०० आणि बागायती क्षेत्रातील २२ हजार ८५५ हेक्टर क्षेत्रावरील पिके उध्वस्त झाली आहेत.

जिल्हा प्रशासनाने हेक्टरी नुकसानीचा अहवाल राज्य सरकारकडे पाठविला आहे. नुकसानभरपाईपोटी शेतकर्‍यांना अनुदान वितरीत करण्यासाठी राज्य सरकारकडे ५८ कोटी ९० लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. दरम्यान, ऑक्टोबरमध्ये झालेल्या नुकसानीचे  पंचनामे करण्याचे काम शासन निर्देशानुसार सुरु आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment