अधिकारी आणि नेतेमंडळी पंचनामे करण्यास टाळाटाळ करतायत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांना यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. राज्यासह जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांचा दौरा करण्यासाठी नेत्यांची लगबग सुरु आहे.

मात्र केवळ दौरे करत असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यास मात्र पदरी निराशाच पडत आहे. ते चित्र सध्या श्रीरामपुरात मध्ये दिसत आहे. श्रीरामपूर पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना, येथील स्थानिक प्रशासन ढिम्म आहे.

“सरकारकडे पैसे नसल्याने यंदा नुकसानभरपाई मिळणार नाही; मग पंचनामे कशासाठी करायचे’ असे सांगून काही अधिकारी व नेतेमंडळीही पंचनामे करण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. किमान नुकसानीच्या परिस्थितीचा आढावा नोंदविण्यासाठी तरी पंचनामे करणे आवश्‍यक आहे.

मात्र, तालुक्‍यात प्रत्यक्ष तसे होताना दिसत नाही. राज्यात यंदा सर्वत्र जोरदार पाऊस झाला. अतिपावसामुळे यंदा तालुक्‍यात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. प्रशासनाच्या सुचनेनुसार कृषी विभागाने जिल्ह्यासह राज्यात नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रारंभ केला.

मात्र, तालुक्‍यातील काही अधिकारी आणि नेतेमंडळी पंचनामे करण्यास टाळाटाळ करीत असल्याची तक्रार शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

तालुक्‍यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बाधित पिकांचे पंचनामे करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

यावेळी राजेंद्र भांड, सुरेश ताके, जितेंद्र भोसले, रामकृष्ण आसने, दत्तात्रेय लिप्टे, ईश्वर दरंदले, महेश लवांडे, अतुल खरात, राजेंद्र थोरे आदींनी ही मागणी केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment