नगरकरांसाठी शिवसेना माजी शहर प्रमुखांनी केली हि महत्वाची मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-  देशासह राज्यात कोरोनाचे संकट कायम आहे. हळूहळू याची तीव्रता कमी होत असल्याने सरकारने लॉकडाउनच्या नियमांमध्ये शिथिलता दिली आहे.

याच अनुषंगाने नगर शहरातील वाडिया पार्क हे खुले करण्यात येऊ अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने केली आहे. राज्यासह देशात कोरोना महामारीमुळे मागील अनेक महिन्या पासून बंद असलेली शहरातील क्रीडागणे वाडियापार्क व इतर मैदाने नागरिकांना फिरण्यासाठी सुरु करण्यात यावी.

त्यामुळे नागरिकांचे आरोग्य अबाधित राहील. अनेक दिवसापासून मैदाने बंद असलेने नागरिकांना मोकळा श्वास घेता येत नाही .

अनेक नागरिकांना सकाळी- संध्याकाळी फिरण्याची सवय लागलेली असताना अचानकपणे सर्व बंद असल्याने नागरिकांना फिरता येत नाही. परिणामी त्याच्या आरोग्यवर परिणाम होऊ शकतो.

सर्व क्रीडांगणे मैदाने बंद असल्याने नागरिक रस्त्याने पहाटे किंवा रात्री फिरत असतात त्यामुळे नागरिकांना रस्त्याने ये-जा करणारे मोठ्या धोका पत्करावा लागतो. यामुळे अपघात होण्याचा धोका असतो.

आता सर्वत्र हळूहळू सर्व कामकाज सुरळीत सुरु झाल्याने हि मैदाने हि सुरू करण्यात यावी अशी मागणी माजी शहर शिवसेनाप्रमुख संभाजी कदम यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment