थकीत पगारामुळे वाढला कर्जाचा डोंगर; त्याने उचलले टोकाचे पाऊल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-कोरोनामुळे अनेक ठिकाणी बेरोजगारीचे वारे जोराने वाहू लागले आहे. नौकरी गेल्याने अनेक जण सध्याच्या स्थितीला आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यातच एका जणाने कर्जाचा वाढता डोंगर व थकीत पगार याला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना पारनेर तालुक्यात घडली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी कि, पारनेर तालुक्यातील नांदूरपठारचा राजू बबन आग्रे हा तरूण शेतकरी चिंतेत होता. सुरूवातीस दुष्काळी स्थिती व आता संततधार पावसामुळे स्वतःचे, कुटूंबाचे भवितव्य काय चिंतेत असलेला राजू हा नांदूरपठार ग्रामपंचायतीचा कर्मचारी होता. राजुने ग्रामपंचायतीच्या पगारावर आपला संसार नेटाने चालविला होता.

अचानक ग्रामंपचायतीचा पगार थांबला व त्या पाठोपाठ दुष्काळ तसेच अतिवृष्टीने त्याच्या संसारास दृष्ट लागली. रब्बी पेरण्यांचा हंगाम संपत आला तरी पाउस थांबण्याचे नाव घेत नसल्याने रब्बीचा हंगाम हातचा गेल्यावर काय करणार या चिंतेत असलेल्या राजू आग्रे याने आपली जिवन यात्रा संपविण्याचा निर्णय घेतला.

घराच्या छताला गळफास घेउन गुरूवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्याने त्याची जिवनयात्रा संपविली. दरम्यान, राजू आग्रे याच्या आत्महत्येनंतर पारनेर पोलिस ठाण्याचे सहा. पोलिस निरिक्षक प्रमोद वाघ यांनी घटनास्थळी भेट देउन पंचनामा केला. टाकळीढोकेश्‍वर येथील ग्रामिण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात राजू याचा मृतदेह सुपूर्द करण्यात आला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment