शेतकरी विरोधी असलेल्या केंद्र सरकार विरोधात काँग्रेस झाली आक्रमक… घेतला हा निर्णय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  कृषी विधेयकावरून गेले काही दिवसांपूर्वी देशातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.

केंद्रातील मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय न घेता शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरणारे विधेयक मंजूर करून शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे.

यामुळे काँग्रेस पक्षाने आक्रमकता स्वीकारली आहे. केंद्र सरकारने शेतकरी विरोधात आणलेल्या काळ्या कायद्याविरोधात जामखेड तालुक्यातील 30 हजार शेतकऱ्यांच्या सहा घेण्याच्या मोहीमेला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे.

यावेळी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात युवक काँग्रेसचे जिल्हा समन्वयक राहूल उगले यांच्या मार्गदर्शनाखाली हि मोहीम सुरु करण्यात आली.

यावेळी जिल्हा सचिव सुनील शिंदे, युवक काँग्रेसचे शिवराज घुमरे, जिल्हा सहसचिव तात्या काळे, तालुका उपाध्यक्ष कुंडल राळेभात, नगरसेवक अर्शद शेख, अल्पसंख्यांक काँग्रेस तालुकाध्यक्ष फिरोज पठाण,

शहर काँग्रेसचे अशोक निमोणकर, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष भागिनाथ उगले आदी काँग्रेस व युवक काँग्रेस चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थितीत होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment