निसर्गाने हिरावला घास आता त्यांना केवळ मदतीची आस

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले आहे.

हातातोंडाशी आलेला घास हा निसर्गाच्या प्रकोपापुढे टिकू नाही शकला. या आर्थिक नुकसानीने बळीराजा हतबल झाला आहे.

आता या भयाण परिस्थितीत केवळ आर्थिक मदतीची अपेक्षा लावून बसलेल्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई कधी मिळणार एवढीच आस लागून आहे.

परतीच्या पावसाने शेतकर्‍यांची पिके उद्ध्वस्त झाल्याने प्रचंड नुकसान झाले असून शेतकर्‍यांचा आर्थिक कणा मोडून गेला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्र्यांनी मदतीची ग्वाही दिली आहे.

मंत्रिमंडळाची आज बैठक होत असून त्यात या मदतीचा निर्णय होण्याची शक्यता असल्याने या निर्णयाकडे नगर जिल्ह्यासह राज्यातील शेतकर्‍यांच्या नजरा लागून आहेत.

दरम्यान कालच जिल्ह्याचे पालकमंत्री नुकसानग्रस्त भागांची पाहणीसाठी नगर जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी पालकमंत्री मुश्रीफ यांनी देखील शेतकऱ्यांना दिलासा देत नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment