अबब ! पाऊस पुन्हा येणार ; ‘ह्या’ भागात पावसाचा इशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :-सध्या पावसाने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळवले आहे. जूनच्या पूर्वार्धात सुरु झालेला पाऊस अद्यापही सुरूच आहे. मध्यंतरी थंडावलेला पाऊस सुखावणारा असला तरी पुन्हा एकदा हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे.

पुढील काही तासांत पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी ट्विट करत पावसाची माहिती दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा कोकणातील रायगड, रत्नागिरीत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पु

ढच्या तीन ते चार तासांत हा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान, परतीच्या पावसाने राज्यातील अनेक भागात हाहाकार उडाला आहे. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील अनेक भागात अतिवृष्टी झाली.

यामुळे नद्या, नाल्यांना पूर आले. अनेक ठिकाणी रस्ते बंद होऊन जनजीवन विस्कळित झाले होते. अहमदनगर जिल्हाही याला अपवाद नाही. जिल्हयाच्या विविध भागात परतीच्या पावसाने विजांच्या लखलखाटात, ढगांच्या गडगडाटासह धुडगूस केला .

नगर, श्रीरामपूर शहर, शिर्डी, राहाता, राहुरी, अकोले, कोपरगाव, नेवासा संगमनेरात पावसाने जोरदार हजेरी लावली. या नुकसानीची मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment