आ. राधाकृष्ण विखे यांचा खळबळजनक आरोप ; बदल्यांसाठी सरकारने केलय ‘असे’ काही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- सध्या महाराष्ट्रात अतिवृष्टीने अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. कोरोनाने पिचलेला शेतकरी आता आणखीनच हवालदिल झाला आहे.

त्यामुळे अस्तगाव व रुई येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची विखे पाटील यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर तोफ डागली. ते म्हणाले, राज्यातील मंत्र्यांना शेतकऱ्याचे काही देणे घेणे नाही.

मंत्रालयात शेतकऱ्यांच्या भरपाईचे नव्हे, तर अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे नियोजन केले जाते. त्यातील अनेक बदल्यांना मॅटची स्थगितीदेखील मिळते. बदल्यांसाठी “मेन्यू कार्ड’ तयार केले आहे, अशी टीका आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

नुकसानीच्या पाहणीनंतर विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या. पत्रकारांशी बोलताना विखे पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना फळबागांसाठी हेक्‍टरी 25 हजार रुपये व अन्य पिकांसाठी हेक्‍टरी 10 हजार रुपये भरपाईची घोषणा केली.

मात्र, त्यात अटी व शर्ती लागू असल्याने, बरेच शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार आहेत. तसे झाले, तर हा शेतकऱ्यांचा विश्वासघात ठरेल. दरम्यान, परतीच्या पावसाने राज्यातील अनेक भागात हाहाकार उडाला आहे.

कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील अनेक भागात अतिवृष्टी झाली.

यामुळे नद्या, नाल्यांना पूर आले. अनेक ठिकाणी रस्ते बंद होऊन जनजीवन विस्कळित झाले होते. अहमदनगर जिल्हाही याला अपवाद नाही. जिल्हयाच्या विविध भागात परतीच्या पावसाने विजांच्या लखलखाटात, ढगांच्या गडगडाटासह धुडगूस केला .

नगर, श्रीरामपूर शहर, शिर्डी, राहाता, राहुरी, अकोले, कोपरगाव, नेवासा संगमनेरात पावसाने जोरदार हजेरी लावली. या नुकसानीची मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment