खासदार विखे म्हणतात बांधावर फोटोशेषन करण्याऐवजी शेतकऱ्यांना मदत करा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- अतिवृष्टीच्या काळात राज्य सरकारची कार्यपद्धती पूर्णपणे फोल ठरले असून प्रसिद्धीसाठी शेतकऱ्याच्या बांधावर चाललेले फोटोशेषन करण्याऐवजी अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे.

आज दौरे करण्यापेक्षा दौऱ्यावरील खर्च वाचून शेतर्क­याला मदत केल्यास त्यांना हजार दोन हजारांची मदत जास्त मिळुन फायदा होईल. पण वेगवेगळ्या मंत्र्यांचे दौरे काढून नुकसानीची पाहणी करण्यात व्यस्त आहेत. दुसरीकडे देशाचे पंतप्रधानांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये जमा करून त्यांना मदत केली आहे.

अशा प्रकारच्या भरीव मदतीची शेतकऱ्यांना गरज आहे. असे खासदार डॉ.सुजय विखे पाटील म्हणले. ना.नितीन गडकरी केंद्रीय मंत्री रस्ते वाहतुक आणि परिवहन विभाग याच्या विशेष प्रयत्नातून अहमदनगर जामखेड राष्ट्रीय महामार्गाचे डांबरीकरण व नूतनीकरणाचा श्ुंभारंभ समारंभ टाकळी काझी येथे आयोजीत केला होता.

यावेळी ते बोलत होते. आमदार पाचपुते म्हणाले की, सध्या पाऊस पूर्णपणे थांबलेला नाही किंवा कोरोनाचे संकट ही संपलेले नाही. अशा अवस्थेत शासनाकडून शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणे अपेक्षित होते. पण अत्यंत तुटपुंजी मुदत जाहीर करत निराशा केली आहे. प्रत्येक वेळी केंद्राच्या मदतीची अपेक्षा करत राज्यशासन आपल्या कर्तव्यात टाळाटाळ करत आहे.

माजी.आ.कर्डिले यांनी शासनाच्या कार्यपद्धतीवर टीका करत आज राज्यातील सर्व अंतर्गत रस्ते अत्यंत दुरावस्था पूर्ण झालेले आहेत नगर जामखेड वस्तीत व्यवस्था अत्यंत खराब झालेली होती

त्यास ना.नितीन गडकरी केंद्रीय मंत्री रस्ते वाहतुक आणि परिवहन विभाग याच्या विशेष प्रयत्नातून या राष्ट्रीय महाभार्गा साठी २२ कोटी निधी डांबरीकरण व नुतनीकरणास उपलब्ध झाला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment