आमचे सरकार कायम शेतकर्‍यांच्या पाठीशी राहणार; महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- राज्यात सुमारे 40 लाख हेक्टर नुकसान ग्रस्त झाले असून आर्थिक संकट व कोरोनाची स्थिती या काळात शेतकर्‍यांना सरकारने मोठी मदत केली आहे.

कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार शेतकर्‍यांच्या कायम पाठीशी राहणार असून शेतकर्‍यांना व नागरिकांना मदतीसाठी प्रशासनाने अधिक सतर्क रहावे अशा सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

परतीच्या पावसाने अहमदनगर जिल्ह्यात व संगमनेर तालुक्यात नुकसान झालेल्या सर्व नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत हि मिळालीच पाहिजे. याकरिता प्रशासनाने तातडीने पंचनामे करा. तसेच कोरोनाबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन थोरातांनी केले आहे.

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात अमृत कलांच या ठिकाणी नवीन अधिकार्‍यांसमवेत झालेल्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना मंत्री थोरात म्हणाले कि, कोरोना हे मोठे संकट राज्यावर व जिल्ह्यात आले आहे.

त्या विरुद्ध लढताना प्रशासनाच्या विविध विभागातील अधिकार्‍यांनी खूप चांगले काम केले म्हणून कोरोनावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता आले आहे. जिल्ह्याचा मृत्यू दर पाच टक्क्यांवर आला असून संगमनेर तालुक्याचा मृत्युदर एक टक्क्यावर आला आहे. ही आनंदाची बाब आहे. मात्र याबाबत नागरिकांनी अजूनही सतर्क राहायला पाहिजे.

यावेळी उपस्थित जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले, की येत्या दोन दिवसांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील संपूर्ण पंचनामे पूर्ण करून आपल्या जिल्ह्याला साधारण पुर्ण पंचनामे झाले तर अडीचशे कोटी मदत मिळण्याची अपेक्षा आहे. ही मदत तातडीने शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवली जाईल.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment