खा. सुजय विखेंच्या पवारांबाबतच्या ‘त्या’ विधानावरून राजकारण तापले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यातील के के रेंज प्रश्न हा अगदी शेतकऱ्यांच्या जीव्हारीचा प्रश्न आहे. या प्रश्नासंदर्भात स्थानिक सर्वच लोकप्रतिनिधींनी आपापल्यापरीने आवाज उठविला आहे. याबाबत स्वतः शरद पवार यांनी मध्यस्ती करत दिल्लीपर्यंत जाऊन आपली भूमिका मांडली.

परंतु नुकतेच खा. सुजय विखे यांनी खा. शरद पवारांबाबत जे विधान केले त्यावरून राजकीय वाद सुरु होण्याची चिन्हे आहेत. ‘के के रेंज प्रश्नासंदर्भात जी वस्तुस्थिती आहे ती मी तुम्हाला सांगितली आहे. आता त्याच्यापुढे अजून काय असेल तर ते भाजपचे खासदार आहेत,

त्यांनी मंत्रालयात काय शिजतं हे विषद करावं,’ असे वक्तव्य राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले व एकप्रकारे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना आव्हानच दिले. ‘विखे यांच्या वक्तव्यावर मला फार भाष्य करायचे नाही. मला एवढेच माहिती आहे, शरद पवार हे राजनाथ सिंह यांच्याकडे गेले होते.

आमदार निलेश लंके हे देखील त्यांच्यासोबत होते. मी त्यावेळी करोनामुळे आजारी असल्याकारणाने जाऊ शकलो नाही. मात्र, त्या बैठकीत पवार साहेबांनी वस्तुस्थिती मांडली. त्यानंतर वरती काय चक्र फिरले, मला माहिती नाही. परंतु काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयात संरक्षण विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी येऊन सांगितले

की आम्ही जमीन अधिग्रहण करणार नाही. आता जिल्हाधिकाऱ्यांना लष्कराचे अधिकारी सांगत असतील, तर के के रेंज प्रश्नासंदर्भात संभ्रम निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही असेही राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले.

काय म्हणाले होते खा. डॉ. सुजय विखे ? :- ‘के के रेंज प्रश्नासंदर्भात आम्ही जी भूमिका तत्कालीन दौऱ्यात मांडली त्यावर आजही ठाम आहोत. त्या भूमिकेत कोणताही बदल नाही. त्यामुळे आता शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवायचा की नरेंद्र मोदी यांच्यावर हे जनतेनेच ठरवावे. भविष्यकाळात कोण खरे ठरते, हे निवडणुकीपूर्वी जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाही.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment