बियाणांचा काळाबाजार करणाऱ्या एकास पोलिसांनी घेतले ताब्यात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनाच्या संकटाच्या काळात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान भरून काढणाऱ्या कांदा बियाणांचा काळाबाजार होत असल्याची घटना जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यत देखील घेतले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी कि, बोगस कांदाबियाण्याची साठवणूक करून याची परस्पर विक्री खासगी विक्रेते व शेतकऱ्यांना वितरित केल्याप्रकरणी मांडवगण (ता. श्रीगोंदे) येथून श्रीगोंदे पोलिसांनी एकास ताब्यात घेतले.

अमोल प्रकाश धबागडे (मूळ रा. यवतमाळ, हल्ली मांडवगण), असे आरोपीचे नाव आहे. याबाबत तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी माहिती दिली कि, कृषी विभाग व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या संयुक्त पथकाने मांडवगण येथे छापा घातला.

विराट ऍग्रो इनपुट, जालना या कंपनीच्या नावे असलेल्या कांदाबियाण्याचे 500 ग्रॅमचे 80 बॉक्‍स, 70 किलो सुटे कांदाबियाणे, सीलिंग मशिन, प्लॅस्टिकच्या रिकाम्या पिशव्या, असा अंदाजे तीन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. संबंधित बियाण्याचा नमुना पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविला आहे.

मोहीम अधिकारी राजेश जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. याबाबत राजेश जानकर म्हणाले, की शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे बियाणे हे अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावे. तसेच, खरेदीच्या वेळी न विसरता त्याचे परिपूर्ण बिल घ्यावे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment