यंदाच्या वर्षी जिल्ह्यात विक्रमी ऊसाचे गाळप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :- यावर्षी राज्यतील साखर कारखान्याना 15 ऑक्टोबर पासून गळीत हंगाम सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली. दि.10 नोव्हेंबर अखेर राज्यातील 47 सहकारी व 54 खाजगी अशा एकूण 101 साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले होते

यंदाचे सध्या सुरू असलेल्या गळीत हंगामात राज्यातील 101 साखर कारखान्यांनी 10 नोव्हेंबर 2020 अखेर 45.9 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 38 लाख 8 हजार क्विंटल साखर उत्पादित केली आहे.

नगर जिल्ह्यातील एकूण 16 साखर कारखान्यांनी 10 नोव्हेंबर 2020 अखेर 9 लाख 14 हजार मे टन उसाचे गाळप करून 6 लाख 38 हजार 500 क्विंटल साखर निर्मिती केली आहे.

जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा 06.99 टक्के आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक 1 लाख 69 हजार 160 टन ऊस गाळप अंबालिका कारखान्याने केले आहे.

तर सर्वाधिक 7.39 टक्के साखर उतारा मुळा कारखान्याचा आहे. जिल्ह्याचा एकूण सरासरी साखर उतारा जवळपास 7 टक्के आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment