यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांचा कल ‘या’ पिकांकडे वाढला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-यंदा सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली असल्याने दुष्काळाची चिंता मिटली आहे. उत्तरेकडील प्रवरा आणि मुळा नदीपट्ट्यातील पाचेगाव, पुनतगाव, चिंचबन, खुपटी, गोणेगाव, इमामपूर, निंभारी, तिळापूर, खिर्डी आदी गावामध्ये ऊस आणि कांदा, गहू आदी पिकाच्या लागवडीकडे शेतकर्‍यांचा कल दिसून येत आहे.

शेतकरी सध्या कांदा रोपे टाकण्यावर भर देत आहेत. यंदाच्या पावसाळ्यात पाचेगाव परिसरात ऑक्टोबर अखेर 858 मिलिमीटर (34 इंच) पावसाची नोंद झाली. लाभक्षेत्रात पडलेल्या मान्सून आणि परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली.त्यामुळे परिसरातील भूगर्भामधील पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे.

या परिसरातील आज देखील विहिरी, बोअरवेल जमिनीच्या काठोकाठ भरलेले दिसून येत आहे. तसेच नेवासा तालुक्यातील पाचेगाव आणि पुनतगाव बंधारे ओव्हरफ्लो झाले आहे. दोन्ही बंधारे भरल्याने अडीच हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून ऊस आणि कांदा लागवडीमध्ये वाढ होणार आहे.

दरम्यान यंदाच्या वर्षी पाण्याची पातळी वादळी असून बंधारे पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. बंधारे भरल्याने शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदा अती पावसामुळे खरीप पिकाची नासाडी झाली. आता शेतकर्‍यांच्या उरल्यासुरल्या आशा रब्बी हंगामावर टिकून आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment