वीजबिल माफीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आंदोलन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-कोरोनामुळे मार्च ते ऑगस्ट या टाळेबंदीच्या काळातील वीजबिलात सवलत देण्याची भूमिका राज्य सरकारने जाहीर केली होती.

मात्र, ती मागे घेऊन वीजबिलाची सक्तीने वसुली करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. याचाच निषेध म्हणून शेवगाव येथे महावितरणच्या कार्यालयासमोर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

कोरोनामुळे लागू केलेल्या टाळेबंदीच्या काळातील वीजबिलात सवलत देण्याऐवजी ते सक्तीने वसुलीची तयारी महावितरण करत आहे. कोरोनाकाळात उत्पन्नाचे स्रोत बंद झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना वीजबिल भरणे अशक्‍य झाले.

याच काळात सरकारने वीज दरवाढीची घोषणा करून त्यानुसार वीजबिले ग्राहकांना देण्यात आली. आता त्यात सवलत देण्याऐवजी सक्तीने वसुलीचा निर्णय महावितरणने घेतल्याने नागरिकांच्या अडचणींत भर पडली आहे.

याचाच विरोध म्हणून भाकपने आंदोलन छेडले होते. विजेची दरवाढ रद्द करावी, टाळेबंदीच्या काळातील व शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावे, तसेच सक्तीने सुरू असलेली वसुली थांबवावी,

अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा भाकपने दिला आहे. हे आंदोलन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ॲड. सुभाष लांडे, ज्येष्ठ नेते शशिकांत कुलकर्णी,

संजय नांगरे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले होते. यावेळी किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष बापूराव राशीनकर, बाजार समितीचे संचालक अशोक नजन,

आत्माराम देवढे, दत्ता आरे, रत्नाकर मगर, प्रेम अंधारे, विश्वास हिवाळे, बापूराव लांडे, अक्षय खोमणे आदींसह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment