मुलांना सुसंस्कारांची गरज : माधुरी चोभे स्वयंभू प्रतिष्ठानने मातोश्री वृद्धाश्रमात केली दिवाळी साजरी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :-डिजिटल युगात माणसाने बरीच प्रगती साधली आहे. मात्र, त्यातील माणूसपण हरपले आहे. त्याला आपल्या कर्तव्याची जाणच उरलेली नाही.

आई-वडिलांना ज्या काळात मुलांच्या आधाराची गरज असते त्यावेळी त्यांना घराबाहेर काढले जात आहे. अशा अनेक घटना सर्रासपणे घडत आहेत. पालकांनी मुलांना योग्य वेळी कर्तव्याची जाणीव करून देणे आवश्यक आहे. मुलांवर चांगले संस्कार करण्याची गरज आहे,

तरच पुढचं आयुष्य सुखकर होईल, असे मत लोकरंग फाऊंडेशनच्या अध्यक्षा माधुरी चोभे यांनी व्यक्त केले. स्वयंभू प्रतिष्ठानच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रम येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. स्वयंभू प्रतिष्ठानने यंदाची दिवाळी निराधार वृद्धांसमवेत साजरी केली.

यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळी फराळ आणि कपड्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी जयश्री आंधळे, सचिन बेरड, व्यवस्थापक दिलीप चोरडिया, तसेच स्वयंभूचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पांडुरंग काळे यांनी केले. त्यांनी स्वयंभू या विद्यार्थी संघटनेबद्दल माहिती दिली.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ही संघटना स्थापन करण्यात आली. मात्र, स्वयंभूने रक्तदान चळवळही सुरू केली आहे.

तसेच विविध सामाजिक संस्थांना सर्वतोपरी सहकार्य करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. तसेच प्रतिष्ठानचे काम जिल्हाभर चालू आहे, अशी माहिती अध्यक्ष सागर नगरे यांनी दिली. मान्यवरांचे आभार नेहा कुकरेजा यांनी मानले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment