मनसेला रस्त्याच्या कामाचे श्रेय मिळु नये म्हणुन शिवसेना भाजपची अभद्र युती एकत्र !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-खुप दिवसांनी काटवन खंडोबा रस्त्याचा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या वतीने वारंवार निवेदन देऊन,अंदोलन करुन दलित वस्ती सुधार निधी योजनेतुन मार्गी लावला.

व कामाल सुरवात झाली या कामाकरीता उपायुक्त तसेच शहर अभियंता यांनी सुद्धा खुप मोठा हातभार लावला. परंतु ज्या शिवसेना नगरसेवकांनी या कामाल दलित वस्ती सुधार निधी योजनेतून हे काम करू नये असे पत्र आयुक्तांना देऊन या कामाल विरोध केला तेच नगरसेवक या कामाचे श्रेय घेण्यासाठी उद्घाटन करतात हे जनतेच्या मनाला पटणारे नाही.

त्यांच्या बरोबर असणारे भाजपचे जेष्ठ नेते अभय आगरकर यांनी आपल्या 30 वर्ष राजकारणात नगराध्यक्ष्या पासुन अनेक पदे त्यांनी त्यांच्या घराण्यातील सदस्यांनी भोगली पन एक रुपयाचा निधी कधी काटवन खंडोबा रस्त्याला दिला नाही आणला देखील नाही. उलट मनसने मार्गी लावलेल्या कामाचे उद्घाटन अभय आगरकर यांनी केले.

आगरकरांनी या प्रभागा साठी काडीचेही काम आजपर्यंत इतके मोठे नेते असुन देखील केले नाही अभय आगरकर म्हणजे नाव मोठे लक्षण खोटे असे नेते असल्याची टिका मनसेचे नितीन भुतारे यांनी केली 2 वर्ष भाजपच्या खासदारांनी या काटवन खंडोबा रस्त्याचे काम निधी देण्याच्या आशेवर थांबुन ठेवले होते.

त्या खासदारांना देखील या रस्त्याच्या कामा संदर्भात एक फोन देखील केला नाही. ईतक्या दिवसांनंतर या रस्त्याचे काम मनसेने मार्गी लावले त्याचे श्रेय मनसेच्या नितीन भुतारे व पक्षाला नको म्हणुन या कामाचा आव आणण्यासाठी शिवसेना भाजपची अभद्र युती एकत्र आली ही टिका सुध्दा नितीन भुतारे यांनी केली असुन

शिवसेना भाजपच्या नेत्यानी स्वता कामे मार्गी लाऊन कामांचे उद्घाटन करावे मनसेने मार्गी लावलेल्या कामांचे श्रेय घेऊ नये असा सल्ला देखील मनसेच्या नितीन भुतारे यांनी शिवसेना नगरसेवक व भाजपचे अभय आगरकर यांना दिला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment